ज्ञानरचनावाद अभ्यास दौरा - प्रेरणा
ज्ञानरचनावाद अभ्यास दौरा - प्रेरणा
कुमठे बीट, सातारा
मा प्रधान सचिव यांच्या बुलडाणा येथील आढावा बैठकीनंतर कुमठे बीट येथे अभ्यास दौरा निश्चित करण्यात आला. अधिकारी व पदाधिकारी यांनी दिलेल्या उत्साहाने शिक्षकही तयार झाले. मा केंद्रप्रमुख साहेब, DIET Buldana चे मा. प्राचार्य कांबळेसर मा. डूकरे सर, मा जि प उपाध्यक्ष व केंद्र सव येथील शिक्षक यांना घेऊन टिम कुमठे बीट साठी निघाली.
कुमठे बीट च्या विस्तार अधिकारी भराडे madam यांना सर्वप्रथम भेट दिली. त्यांनी शाळांचा मार्ग सहज समजावा म्हणून आमच्या सर्व टिमसह एकेक शिक्षक उपलब्ध करून दिला.
सातारा हाच मुळात निसर्गाच्या कुशीत वसलेला! त्यात कुमठे बीट च्या शाळा सज्जन गडाच्या पायथ्याशी. निसर्गाची लयलूट डोळे भरून पाहत आम्ही प्राथमिक शाळा शेळकेवाडी केंद्र शाळा कुमठे ला पोहचलो. सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने, शाळेची वेळ सकाळच्या शाळेची होती.
दारातच मुलांनी केलेले स्वागत, ढोल टाळ व अप्रतिम नृत्य यामुळे सावरत नाही, तोच दुसरा धक्का मुलांनी दिला. अॉफीस मध्ये अस्खलित इंग्रजी मधे वर्ग मंत्री शाळेचा परिचय करून देत होते. विभागनिहाय काम व कार्यपद्धती सांगत होते. मुलींचे प्रमाण मंत्रालयात अधिक. शाळेत मुख्याध्यापकांच्या कपाटापासून शाळेतील सनियंत्रण विद्यार्थ्यांना सोपवलेले होते. त्यांच्या चेह-यावरील आत्मविश्वास व आनंद पाहण्यासारखा होता.
इ.१ली व ३री एकत्र बहूवर्ग मॅडम सांभाळत होत्या. वर्गात डेस्क बेंच नाही, कारण रचनावादासाठी गटपद्धत आवश्यक असल्याचं मॅडम सांगू लागल्या. मुले शाळेत येतात आणि खेळत शिकतात. चिंचोके, काड्या, नकली नोटा, खडे, मणी माळ, गोट्या हे शैक्षणिक साहित्य? आम्हाला अजून आश्चर्याचे धक्के देत मॅडम सांगू लागल्या. आम्ही पाढे पाठांतर घेत नाही, शिक्षक खुर्चीवर बसतच नाहीत, मुले शाळेत शेकडा १०० उपस्थित असतात, खिचडीत परसबागेतील सेंद्रिय भाजीपाला वापरतो. शिक्षक शिकवत नाहीत, मुले स्वत:च शिकतात, १४ अंकी संख्या वाचतात, ५-१० मिनीटात दिलेल्या २-३ शब्दांवर गोष्ट, संवाद, कविता बनवतात. जोडाक्षरे अचूक, अक्षरे पाणीदार ...आम्ही पाहतच राहिलो.
इ.१ली व ३री एकत्र बहूवर्ग मॅडम सांभाळत होत्या. वर्गात डेस्क बेंच नाही, कारण रचनावादासाठी गटपद्धत आवश्यक असल्याचं मॅडम सांगू लागल्या. मुले शाळेत येतात आणि खेळत शिकतात. चिंचोके, काड्या, नकली नोटा, खडे, मणी माळ, गोट्या हे शैक्षणिक साहित्य? आम्हाला अजून आश्चर्याचे धक्के देत मॅडम सांगू लागल्या. आम्ही पाढे पाठांतर घेत नाही, शिक्षक खुर्चीवर बसतच नाहीत, मुले शाळेत शेकडा १०० उपस्थित असतात, खिचडीत परसबागेतील सेंद्रिय भाजीपाला वापरतो. शिक्षक शिकवत नाहीत, मुले स्वत:च शिकतात, १४ अंकी संख्या वाचतात, ५-१० मिनीटात दिलेल्या २-३ शब्दांवर गोष्ट, संवाद, कविता बनवतात. जोडाक्षरे अचूक, अक्षरे पाणीदार ...आम्ही पाहतच राहिलो.
मॅडम म्हणाल्या सर हाच ज्ञानरचनावाद ...!!!
इ१ली व३री ला शिकवणा-या शिक्षिकेचे ओघवते निवेदन व उपक्रम सांगणे सूरू असताना एक बाब माझ्या लक्षात आली की हे अतिशय नियोजनपूर्वक केलेलं आहे. साहित्याची निवड, मांडणी, सराव व उपक्रम यात कुठेही विस्कळीतपणा नाही. त्यांनी ते मान्यही केलं व सांगीतलं," सर ही चार वर्षांची तपश्चर्या आहे". प्रथम इ१ली पासून रचनावादी अध्यापन सुरू झालं, बीटस्तरावर संकल्पना समजावून सांगितल्या. पहिल्या बैठकांमध्ये सांगतोय त्यावर विश्वास बसत नव्हता, समजत नव्हतं. वर्षाअखेर यश स्पष्ट दिसायला लागलं आणि विश्वास निर्माण झाला.
इ१ली व३री ला शिकवणा-या शिक्षिकेचे ओघवते निवेदन व उपक्रम सांगणे सूरू असताना एक बाब माझ्या लक्षात आली की हे अतिशय नियोजनपूर्वक केलेलं आहे. साहित्याची निवड, मांडणी, सराव व उपक्रम यात कुठेही विस्कळीतपणा नाही. त्यांनी ते मान्यही केलं व सांगीतलं," सर ही चार वर्षांची तपश्चर्या आहे". प्रथम इ१ली पासून रचनावादी अध्यापन सुरू झालं, बीटस्तरावर संकल्पना समजावून सांगितल्या. पहिल्या बैठकांमध्ये सांगतोय त्यावर विश्वास बसत नव्हता, समजत नव्हतं. वर्षाअखेर यश स्पष्ट दिसायला लागलं आणि विश्वास निर्माण झाला.
ओघतक्तात मांडायचा प्रयत्न करतो
ज्ञानरचनावाद > संकल्पना समजावून घेणे > सकारात्मक होणे > सत्रापूर्वी उपक्रम व साहित्यांचे संपूर्ण नियोजन > विद्यार्थ्यांच्या साहाय्याने शैक्षणिक साहित्य बनवून संग्रहीत करणे व व्यवस्थित मांडणी करणे> नियोजनाप्रमाणे ज्ञानरचनावादी पद्धतीने बहूस्तरावर घटक पूर्ण करणे.
शाळेतील शिक्षकांचे टाचण, नियोजन पाहण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली होती. आम्ही मुद्दाम ते पाहिल्यावर लक्षात आले की, बीट स्तरावर सर्वांच्या विचारांनी व कल्पकतेने विविध खेळ, उपक्रम, साहित्य यांचा विचार आधीच करण्यात आलाय.
उद्दिष्टांना समोर ठेवूनच ( पाठ्यपुस्तकांना नव्हे) घटक नियोजन केलेलं आहे, टाचणही त्यावर आधारित. कसं करायचं याबाबतचं पुर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना. साहित्यही स्वत पण टिकाऊ.
शाळा परिसरातील घटकांचा पुरेपूर उपयोग. खेळाच्या रुपातील अध्ययन अनुभव. पायाभूत घटक पूर्ण झाल्यावरच पुढील घटकाकडे वळायचे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीनुसार स्तरानूसार जाऊ द्यायचे.एडगर डेलचा शंकू आठवतोय ? दृक किंवा श्राव्य पेक्षा प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा.to be continue ...

0 Comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home